उद्धव साहेबांचे मन मोठे आहे पण…

गद्दारांना इशारा आणि शिवसैनिकांना साद! आदित्य ठाकरेंचा ‘त्या’ फोनवर संताप; म्हणाले, “उद्धव साहेबांचे मन मोठे आहे पण…”

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर आणि सत्ताधारी गटावर कडाडून टीका केली आहे. “ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पैसे खाल्ले, त्यांच्याशी कसला संवाद? हा केवळ नालायकपणा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

‘त्या’ फोन कॉलचे नाटक आणि उद्धव ठाकरेंचा मोठेपणा गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून काही आमदारांशी संपर्क होत असल्याचे दावे केले जात आहेत. यावर आदित्य ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, हे सर्व ‘हॅलो-हॅलो’ करण्याचे प्रकार केवळ नाटक आहेत. स्पीकर फोनवर दाखवून जे काही सुरू आहे, त्याला काहीच अर्थ नाही. मात्र, या वादात त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले. “जर कोणाला मोठ्या मनाने पुन्हा पक्षात परत यायचे असेल, तर ते येऊ शकतात, कारण उद्धव साहेबांचे मन खूप मोठे आहे,” असे त्यांनी नमूद केले. पण त्याच वेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.,

मुंबई महानगरपालिकेत खळबळ! ठाकरेंना पुन्हा दे धक्का? काय आहे एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर २.०’?

जनतेच्या न्यायालयात जाणार! आदित्य ठाकरे यांनी आगामी रणनीती स्पष्ट करताना सांगितले की, आता आम्ही सर्वजण राज्याचा दौरा करणार आहोत. हे ‘डरपोक’ लोक पैसे खाऊन पळाले आहेत, पण ज्या जनतेने त्यांना आशीर्वाद दिले होते, त्याच जनतेकडे आम्ही जाऊन पुन्हा संवाद साधणार आहोत. महाराष्ट्राला खरी शिवसेना कोणती हे चांगलेच माहिती आहे. ज्या शिवसेनेला वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वाचवले, तिलाच आज काही लोक संपवायला निघाले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“ही सेना नाही, तर चोरांची टोळी” अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानांचा समाचार घेताना आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाले. ते म्हणाले की, समोरची सेना ही केवळ ‘गुलामांची सेना’ आहे. ज्याला मुख्यमंत्री व्हायचे होते अशा एका चोराने ही टोळी बनवली आहे, अशा कडक शब्दांत त्यांनी टीका केली.

अमित शाह यांच्या विधानावर प्रत्युत्तर, NEET गोंधळावर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

देशातील ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य केवळ राजकारणच नव्हे, तर देशातील ‘पेपरफुटी’ आणि नीट (NEET) परीक्षेच्या गोंधळावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. नागपूरच्या एका विद्यार्थ्याला चक्क अबुधाबीमध्ये परीक्षा केंद्र मिळणे, हे देशातील परीक्षा पद्धतीचे किती दिवाळे निघाले आहे, हेच दर्शवते, असे ते म्हणाले., लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू असून मीडियाने सत्य परिस्थिती जनतेसमोर आणली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Aditya Thackeray on Shivsena: “जे पक्षाच्या विरोधात जातील…”; आदित्य ठाकरेंचा इशारा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top