
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा अखेर तब्बल २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व ९ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. २० जून २०२६ रोजी लागलेल्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
तपासाचा पायाच ठिसूळ: कोर्टाचे गंभीर निरीक्षण दीड तास चाललेल्या या सुनावणीत न्यायालयाने सीबीआय आणि पोलिसांच्या तपासावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. न्यायाधीश म्हणाले की, या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ आहे. या खटल्याची मुख्य मदार माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवर होती. मात्र, त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे सांगत न्यायालयाने ती फेटाळून लावली. जैनच्या जबाबात अनेक विसंगती होत्या; कधी तो एक तर कधी दुसरेच विधान करत होता. पोलिसांनी त्याला १५ दिवस मारहाण करून आणि औषधे बंद करून जबाब घेतल्याचेही समोर आले, जे कायद्याला धरून नाही.

तपासातील मोठ्या चुका ज्यांनी खटला कमकुवत केला: १. तांत्रिक पुराव्यांचा अभाव: पोलिसांनी एकाही आरोपीचा मोबाईल जप्त केला नाही किंवा त्यांचे सीडीआर (Call Detail Records) काढले नाहीत. जर सीडीआर तपासले असते, तर ठोस पुरावे मिळाले असते, असे मत न्यायालयाने नोंदवले. २. विसंगत माहिती: माफीचा साक्षीदार म्हणाला की तो पाटील यांना मलबार हिलवरील बंगल्यावर भेटला, मात्र प्रत्यक्षात पाटलांचा बंगला कुलाब्याला होता. ३. गाडीचा संभ्रम: हत्येसाठी वापरलेली गाडी जळून खाक झाली होती, तरीही पोलिसांनी तिचा रंग कसा नोंदवला? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. गाडीच्या रंगाबाबत आणि ती कुठे पार्क केली होती, यावरून साक्षीदारांच्या जबाबात मोठी तफावत होती.
चीनचा ‘वॉटर बॉम्ब’ डाव? तिबेटमध्ये जगातील सर्वात मोठ्या धरणाचे काम सुरू; भारताचा ₹1.5 लाख कोटींचा प्रतिउत्तर प्लॅन
काय होते प्रकरण? ३ जून २००६ रोजी कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काजी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यातून ही सुपारी देण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणात एकूण १२७ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. मात्र, अखेर “संशयाचा फायदा” देत न्यायालयाने सर्व आरोपींची सुटका केली आहे.
२० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लागलेल्या या निकालाने तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Mahesh Rathod is a News Writer at Maharashtra Trending with over five years of experience covering Maharashtra politics, breaking news, social issues, crime, and current affairs. He is committed to delivering accurate, timely, and reliable news that keeps readers informed about the latest developments across the state.








