ओमराजे तुला खूप जपलं पण शेवटी तू गद्दार निघालास, भाजपचा उल्लेख ‘बाबर जनता पार्टी

विश्वासघाताची ती रात्र आणि ओमराजेंवर टीका

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ओमराजे निंबाळकर यांच्याशी झालेल्या शेवटच्या संवादाचा अत्यंत भावनिक आणि राजकीय खुलासा केला.

ठाकरेंनी सांगितले की, पक्ष फुटण्याच्या आदल्या रात्री मध्यरात्री दीड-पावणे दोन वाजेपर्यंत त्यांनी ओमराजेंना जपण्याचा प्रयत्न केला होता.

“मी माणसांना जपणारा माणूस आहे, खासदार तर उद्याही निवडून येतील, पण मला एक एक माणूस महत्त्वाचा होता,” असे सांगताना ठाकरेंचा आवाज गहिवरलेला होता.

वर्दीची निष्ठा की विचारांची ओढ? राज ठाकरेंची टीका आणि काँग्रेसचे आरोप

मात्र, त्याच वेळी त्यांनी ओमराजेंच्या चेहऱ्यावरील हावभावांचे वर्णन करताना म्हटले की, “त्याच्या चेहऱ्यावर पाप दिसत होते. मी त्याला विचारले होते की काही तणाव आहे का? पण त्याने नकार दिला.

” ज्या खासदाराला निवडून आणण्यासाठी आणि सावरण्यासाठी पक्षाने ताकद लावली, तोच खासदार ‘गद्दारी’ करून गेल्याचा शल्य ठाकरेंनी बोलून दाखवले.

ओमराजेंच्या विविध आर्थिक प्रकरणांचा आणि घोटाळ्यांचा उल्लेख करत, आता ते माणूस म्हणायच्या लायकीचे राहिले नसल्याची कठोर टीका त्यांनी केली.,

खासदारांचे ‘कौटुंबिक’ बहाणे आणि पक्षातील फूट

पक्षात फूट पडण्यापूर्वी जेव्हा खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, तेव्हा विविध खासदारांनी हजेरी टाळण्यासाठी कशी कारणे दिली, याचा पाढाच ठाकरेंनी वाचला.

  • यवतमाळचे खासदार: मुलीला पाहायला पाहुणे येणार आहेत, असे कारण दिले.
  • हिंगोलीचे खासदार: मुलाची निवडणूक असल्याचे सांगितले.
  • शिर्डीचे खासदार: पत्नी आजारी असल्याचे कारण पुढे केले.
  • इथले (धाराशिवचे) खासदार: मुलगा पुण्यात हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले.

ठाकरे म्हणाले की, या सर्वांना मी “नका येऊ, आधी कुटुंब सांभाळा” असे मोठ्या मनाने सांगितले, पण प्रत्यक्षात हे सर्वजण दुसऱ्या गटात सामील होण्याची तयारी करत होते,

हे नंतर व्हिडिओमध्ये दिसले. या बहाण्यांवरून गद्दारांनी केवळ पक्षाशीच नाही, तर आपल्या भावनांशीही खेळ केल्याचा आरोप ठाकरेंनी केला.

‘बाबर जनता पार्टी’ – हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्ला

उद्धव ठाकरेंनी या सभेत भाजपवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला. बाबरी मशिदीच्या पतनानंतर ज्या शिवसेनेने पुढाकार घेतला होता,

त्याच भाजपला आज राम मंदिराच्या मुद्द्यावरून त्यांनी घेरले. ठाकरेंनी भाजपचा उल्लेख थेट ‘बाबर जनता पार्टी’ (BJP) असा केला.

त्यांच्या टीकेचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे होते:

१. राम मंदिराची लूट: राम मंदिराच्या उभारणीत भ्रष्ट्राचार होत असल्याचा आरोप करत, चांदीच्या विटा आणि लोकांनी दिलेले दान गायब होत असल्याच्या बातम्या येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

२. बाबरीचा लढा: बाबरी पाडली तेव्हा भाजपचे लोक मागे हटले होते, पण शिवसेना प्रमुखांनी गर्वाने ती जबाबदारी स्वीकारली होती. आज मात्र भाजप त्याच श्रद्धेचा व्यापार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

३. हिंदुत्वाचा गैरफायदा: हिंदुत्वाचे वातावरण निर्माण करून भाजप सत्तेवर आली, पण आता तेच राम मंदिर लुटत असल्याचा घणाघात ठाकरेंनी केला.

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विकास निधीचा बनाव

सत्ताधारी गटाकडून वारंवार “विकास निधीसाठी आम्ही गेलो” असे सांगितले जाते, त्यावर ठाकरेंनी कडाडून टीका केली.

हा विकास निधी जनतेसाठी नसून स्वतःच्या स्वार्थासाठी आणि घोटाळे लपवण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले. संजय राऊत यांनी उल्लेख केल्याप्रमाणे कारखान्यांमधील घोटाळे,

पवनचक्की मधील घोटाळे यांपासून वाचण्यासाठीच ही ‘गद्दारी’ झाल्याचा दावा त्यांनी केला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top