
मुंबई महानगरपालिकेत खळबळ! ठाकरेंना पुन्हा दे धक्का? काय आहे एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर २.०’?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोरात सुरू झाली आहे. खासदारांच्या मोठ्या फुटीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) वळवला असल्याचं स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेच्या साठाव्या वर्धापन दिनाला शिंदेंनी “हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे” असं म्हणत उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज दिलं होतं.
काय आहे शिंदे गटाचा प्लॅन? शिंदे गटाचे खासदार नरेश मसके आणि गटनेते अमय घोले यांच्या विधानांमुळे मुंबईत ‘ऑपरेशन टायगर २.०’ ची चर्चा रंगली आहे. पक्षांतरबंदी कायद्याची टांगती तलवार टाळण्यासाठी ठाकरेंचे किमान ४३ ते ४५ नगरसेवक (दोन-तृतीयांश) फोडण्याचा शिंदे सेनेचा प्रयत्न आहे. सध्या ठाकरेंचे सुमारे २० ते २५ नगरसेवक संपर्कात असून, आकडा पूर्ण होताच याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, असं सूचक विधान अमय घोले यांनी केलं आहे.
ओमराजे निंबाळकर: वडिलांच्या हत्येचा निकाल आणि राजकीय भवितव्य; ठाकरेंसोबत की शिंदेंकडे?
नगरसेवकांमध्ये नाराजी का? या संभाव्य फुटीमागे महत्त्वाची तीन कारणं सांगितली जात आहेत: १. पदवाटपावरून वाद: माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानं विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आणि मिलिंद वैद्य यांसारख्या ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. २. निधीचे असमान वाटप: शिंदे गटाच्या नगरसेवकांना ३ ते १० कोटींचा विकास निधी मिळाला, तर ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या पदरात फक्त २५ लाख पडले. भविष्यातील निवडणुका कशा लढवायच्या, या चिंतेतून अनेक नगरसेवक शिंदे गटाकडे आकर्षित होत आहेत. ३. नेतृत्वाबद्दलची तक्रार: पक्षप्रमुख वेळ देत नाहीत आणि संवादाची कमतरता आहे, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
सेना शिंदेंची अमित शहा फालतू विधान

ठाकरेंसाठी हा मोठा धक्का का? मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी आणि ठाकरे कुटुंबाच्या राजकीय ताकदीचा केंद्रबिंदू आहे. जर मुंबईतच नगरसेवकांनी साथ सोडली, तर तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरचा मोठा प्रश्नचिन्ह ठरेल. दुसरीकडे, यामुळे शिंदे गटाची भाजपसमोर ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढणार आहे, ज्याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपासाठी होऊ शकतो.
मात्र, वरळी, शिवडी आणि दादर यांसारख्या बालेकिल्ल्यांमधील नगरसेवक अजूनही ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे आहेत. आता हे ‘ऑपरेशन टायगर २.०’ यशस्वी होतं की ठाकरेंचा वाघ आपला गड राखतो, हे पाहणं रंजक ठरेल.
खासदारांच्या Operation Tiger नंतर Eknath Shinde, Uddhav Thackeray यांचे BMC मधले 45 नगरसेवक फोडणार ?

Mahesh Rathod is a News Writer at Maharashtra Trending with over five years of experience covering Maharashtra politics, breaking news, social issues, crime, and current affairs. He is committed to delivering accurate, timely, and reliable news that keeps readers informed about the latest developments across the state.







